Coming soon

Health Tips : उन्हाळ्यात वारंवार 'या' 5 समस्यांचा सामना करावा लागतोय? लगेच टोमॅटोसह 'या' पदार्थांचं सेवन टाळा

<p style="text-align: justify;"><strong>Health Tips :</strong> त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा त्वचा लाल होणे, मळमळ होणे किंवा कधी कधी वारंवार उलट्या होणे, अशा समस्या उन्हाळ्यात अधिक त्रासदायक असतात. आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की हे जास्त उष्णतेमुळे किंवा सूर्यप्रकाशाच्या जीसित किरणांमुळे होत आहे. पण हे नेहमीच खरे नसते. कारण ज्यांच्या गुणांची तुम्हाला पूर्ण माहिती नाही ती फळे आणि भाज्या खाल्ल्यानेही या समस्या उद्भवू शकतात.</p> <p><strong>उन्हाळ्यात उद्भवणाऱ्याा आरोग्याच्या समस्या&nbsp;</strong></p> <ul> <li>त्वचा रोग</li> <li>मळमळ</li> <li>अतिसार</li> <li>पोटदुखी</li> <li>लो बीपी</li> </ul> <p><strong>उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या कशा टाळायच्या?</strong></p> <p style="text-align: justify;">निरोगी राहण्यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी, थंडावा देणारे पदार्थ आणि रसदार फळे खावीत. खूप गोड खाण्यासोबतच खूप मसालेदार पदार्थ खाणे आणि फास्ट फूड खाणे टाळावे. कारण या सर्व गोष्टी पचनक्रियेत समस्या निर्माण करून त्वचेच्या समस्या निर्माण करतात.</p> <p style="text-align: justify;">या सर्वांव्यतिरिक्त, तुम्हाला सर्वात जास्त लक्ष देणे आवश्यक आहे ते म्हणजे लाइकोपीनचे सेवन. जर तुम्ही दररोज अशी फळे आणि भाज्या खात असाल ज्यामध्ये लाइकोपीन असते आणि जर तुम्ही एका मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात लाइकोपीनचे सेवन करत असाल तर तुम्हाला मळमळ, पोटदुखी, अतिसार, हाय बीपी, त्वचेच्या समस्यांसोबतच कमी होण्यासारख्या समस्या येऊ शकतात.&nbsp;</p> <p><strong>कोणत्या पदार्थांमध्ये लाइकोपीन असते?</strong></p> <p>टोमॅटो<br />टरबूज<br />पपई<br />गाजर<br />पेरू<br />टोमॅटो सॉस</p> <p style="text-align: justify;">वरील खाद्यपदार्थांपैकी उन्हाळ्यात आपण जवळपास सगळेच पदार्थ दररोज खातो. कोणी सॅलडमध्ये वापर करतात तर कोणी ज्यूस मधून वापर करतात. किंवा कोणी भाजी करतात. परंतु, जर तुम्हाला वर नमूद केलेल्या कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही या पदार्थांचं सेवन मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे.&nbsp;</p> <p style="text-align: justify;"><strong>निरोगी राहण्यासाठी काय खावे?</strong></p> <p style="text-align: justify;">हायड्रेशन आणि पोषण पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन आहारात या गोष्टींचे प्रमाण वाढवावे.</p> <ul> <li>दुग्धजन्य पदार्थ जसे दही, पनीर, टोफू, दूध, ताक, लस्सी.</li> <li>लिंबूपाणी</li> <li>नारळ पाणी&nbsp;</li> <li>कस्तुरी</li> <li>काकडी</li> <li>कच्चा कांदा</li> <li>हिरव्या पालेभाज्या</li> </ul> <p style="text-align: justify;">या सर्व गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश करा आणि लायकोपीनयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. तुम्ही संपूर्ण उन्हाळ्यात निरोगी राहाल आणि तुम्हाला उष्माघात किंवा डिहायड्रेशनची समस्या होणार नाही.</p> <p><strong>(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)</strong></p> <p><strong>महत्त्वाच्या बातम्या :</strong></p> <p><strong><a href="https://ift.tt/betxSoI Tips : 8 तास झोप घेऊनही दिवसभरात झोप येते? असू शकतात हायपरसोमनियाची लक्षणं; वेळीच सावध व्हा</a></strong></p>

from lifestyle https://ift.tt/mgxSiPG
via IFTTT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section