ओव्हर हीटिंग, शॉर्टसर्किटबरोबरच तापमानवाढही देते आगीला निमंत्रण
पुणे - महात्मा फुले पेठेतील भंगाराच्या दुकानाला गुरुवारी मध्यरात्री लागलेली आग, त्यामध्ये एका कामगाराचा झालेला मृत्यू... त्यापाठोपाठ शुक्रवारी दुपारी नगररस्ता परिसरातील दुकानांनाही आग लागली, ही आग आटोक्यात आणल्यानंतर पुढच्या काही तासांतच कॅम्पमधील ‘फॅशन स्ट्रीट’ आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.
अवघ्या २४ तासांच्या आतच शहरात आगीच्या तीन घटना घडल्या. ओव्हर हीटिंग, शॉर्टसर्किट अशी आगीची अनेक कारणे असली तरी बहुतांश घटनांमध्ये उन्हाळ्यातील तापमानवाढीमुळे आगीच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याचे अग्निशामक दलाच्या माहितीद्वारे पुढे आले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी रात्री अकरा वाजेपर्यंत शहरात आगीच्या तीन घटना घडल्या. विशेषतः कॅम्पमधील शिवाजी मार्केटला शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आगीची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री पुन्हा कॅम्पमधीलच फॅशन स्ट्रिटला आग लागून संपूर्ण फॅशन स्ट्रीटच आगीत खाक झाले. अवघ्या काही दिवसांतच घडलेल्या आगीच्या या घटनांची कारणे वेगवेगळी आहेत. मात्र या घटना वाढण्यामागील प्रमुख कारण हे उन्हाळ्यातील तापमानवाढ असल्याचे अग्निशामक दलाने स्पष्ट केले.
पुणे : अग्निशमनदलातील पदं भरतीला वेग येणार का?; तीन वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित
शहरात झालेल्या आगीच्या घटना
वर्ष- घटनांची संख्या- वणवा/कचऱ्याला आग लागणाऱ्या घटना
2020 - 1624 105
2019 - 975 640
2018 - 1353 690
2017 - 1058 540
2016 - 1073 541
आगीच्या घटना कशामुळे घडतात?
उन्हाळ्यामध्ये तापमानात वाढ झालेली असते, त्यामुळे घरांवरील पत्रे, सार्वजनिक कचराकुंडी, त्यामधील कागद, प्लॅस्टिकच्या वस्तू, टेकड्यांवरील गवत गरम झालेले असते. आग लागण्यासाठी आवश्यक तापमान त्यांना वाढत्या उन्हामुळे मिळते. त्यानंतर आगीच्या घटना घडतात.
शॉर्टसर्किट तसेच ओव्हर हीटिंगमुळेही आगीच्या घटना घडतात. अनेकदा एकाच प्लगमधून पंखा, मिक्सर, टीव्ही, फ्रिज अशा अनेक वस्तूंचा वापर केला जातो, त्यामुळेही आग लागते.
महावितरणचा अजब कारभार; बील भरूनही तोडले वीज कनेक्शन
उन्हामुळे भिंती, स्लॅबचे तापमान वाढते, त्यातच किचनमध्ये सातत्याने गॅस सुरू असल्यामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेचा परिणाम गॅस सिलिंडरवर होऊन आगीच्या घटना घडतात.
फॅशन स्ट्रीटमधील आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यात आगीच्या घटना जास्त घडतात. इतर ऋतूंपेक्षा उन्हाळ्यामध्ये तापमान वाढ जास्त होते. परिणामी गवत, कागद, प्लॅस्टिक किंवा अशा वस्तू पेटण्यासाठी आवश्यक तापमान त्यांना मिळते. शॉर्टसर्किट, ओव्हर हीटिंगमुळेही आगीच्या घटना वाढतात.
- प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशामक अधिकारी, अग्निशामक दल
Edited By - Prashant Patil
from Tajya news Feeds https://ift.tt/2NZwZYh
via IFTTT
